सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 2 ऑक्टोंबर) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय उमरखेड येथील सातव्या सत्रातील कृषीदुतांनी उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील टेंभुरदरा ग्राम येथे शेतकऱ्यांना भेट देऊन 28 सप्टेंबर रोजी केले कलम बांधणीबाबत केले मार्गदर्शन.
कृषीदुत समीर फुलझेले, अनिकेत काळबांडे, उज्वल भोयर, हितेश इंगोले, सुधांशू सोरते, वीरेंद्र राऊत, तेजस चव्हाण यांनी शेतकऱ्यांना कलम बांधणीच्या पद्धतीसह कोणकोणत्या झाडांना ही पद्धत उपयुक्त ठरते, कलम बांधताना कोणती काळजी घ्यावी, त्या झाडाचे कसे संरक्षण करावे, याबाबत मार्गदर्शन करतानाच कलम बांधणीचे फायदे सांगितले.
यात पेन्सिलच्या जाडीबद्दल एक वर्ष जुन्या रूटस्टॉकचा वापर करून कलम बनवण्याचे हे एक सामान्य तंत्र आहे. निवडलेल्या फांदीची पाने कलम बनवण्याच्या एक आठवडा आधी कापून काढली जातात. रूटस्टॉकच्या मध्यभागी 3-5 सेमी आकाराचा एक तिरकस चीरा बनविला जातो.
संकूर फांदीवरही त्याच आकाराचा तिरकस चीरा बनवला आहे. त्यानंतर, दसेरी आंबा फांदीचा कापलेला भाग आणि रूटस्टॉक एकमेकांच्या जवळ ठेवून पॉलिथिनच्या पट्टीच्या साहाय्याने बांधले जातात. जुलै-ऑगस्ट हे महिने यासाठी उत्तम आहेत.
या प्रसंगी गावातील उपसरपंच मा. श्री सुभाष चव्हाण, तसेच प्रगतशील शेतकरी निखिल जाधव, विपुल राठोड, ज्ञानेश्वर जाधव, प्रल्हाद जाधव, हरी राठोड, संजय जाधव, विवेक वाढवे उपस्थित होते. यांनी कृषीदुतांना त्यांच्या समस्या सांगितल्या त्यामधीलच एक महत्त्वाची म्हणजे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही.
सोबतच त्यांच्या आणखी समस्या सोडविण्याचा प्रयत्न कृषीदुतांनी केला. तसेच हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री चिंतले सर, प्रा.श्री वाकोडे सर, प्रा. कु. चव्हाण मॅडम, प्रा.श्री तामसेकर सर, प्रा. श्री राऊत सर यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.




