Home महाराष्ट्र बोगस दस्त प्रकरणी बौद्ध समाजातील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा ; संरक्षित कुळ असतानाही...

बोगस दस्त प्रकरणी बौद्ध समाजातील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा ; संरक्षित कुळ असतानाही हक्कावर आली गदा

158

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

म्हसवड : म्हसवड, तालुका मान येथील बौद्ध बांधवांच्या असणाऱ्या जमिनी 1931 सालापासून सातबारा नोंदी संरक्षित कुळ म्हणून आहेत या बौद्ध शेतकऱ्यांना कोणतेही नोटीस न देता बेकायदेशीरपणे प्रस्थापित लोकांनी तलाठी म्हसवड,मंडळ अधिकारी आणि महसूल विभागातील लोकांना हाताशी धरून जमिनीचे बोगस दस्त केले आहेत या बोगस दस्ता विरोधात बौद्ध शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून आम्हाला न्याय मिळावा अन्यथा 18 सप्टेंबर पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे अशी माहिती या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
या क्षेत्रा मध्ये या शेतकऱ्यांनी घर बांधून निवारा बांधला आहे त्या ठिकाणी कायमचे वास्तव्यास आहेत मात्र सदर जमिनीमध्ये सातबाराच्या रेकॉर्डवर प्रस्थापित लोकांची नावे घातली गेली आहेत तरी या नोंदी प्रशासनाने त्वरित रद्द कराव्यात अशी मागणी येथील बौद्ध शेतकरी बांधवांनी केली आहे.
सदर निवेदनात असे म्हटले आहे की बोगस दस्त केल्यानंतर या दस्ताची नोंदी धरू नये म्हणून मंडल अधिकारी यांना रीतसर वकिलामार्फत आमचे म्हणणे देऊन सुद्धा मंडलाधिकारी यांनी राजकीय दबावापोटी सातबारा नोंदी प्रस्थापित व इतर लोकांची नावे सातबारावर व फेरफार वर नोंदी केलेली दिसत आहे सदर अपील मंडल अधिकारी म्हसवड यांनी फेटाळल्यानंतर आम्ही उपविभागीय अधिकारी दहिवडी (मान) यांच्याकडे सुनावणी साठी ठेवले उपविभागीय अधिकारी यांनी स्थगिती आदेश दिला त्यानंतर सदर प्रकरण नव्याने बदलून आलेल्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुनावणीसाठी ठेवले असताना त्यांनी मागील निकालाचे अवलोकन न करता आमचा तक्रार अर्ज फेटाळला असे करताना त्यांनी आमच्याकडे असणारे ठोस पुरावे आणि वकिलामार्फत दिलेले सर्व पुरावे याला विचारात घेतले गेले नाही.
सदर मिळकतीमध्ये आमची कब्जे वहिवाट असून आमच्या वहिवाटीस आज अखेर कोणी हरकत अथवा अडथळा केलेला नाही या मिळकतीमध्ये आम्ही मोसमानुसार ज्वारी, बाजरी, गहू,हरभरा, मका, कांदा, उडीद, मूग, मटकी हे नगदी पिके घेत असतो तसेच काही सर्वे नंबर मध्ये वृक्षांची लागवड केलेली आहे यामध्ये साग, बाभूळ, लिंब, चिंच, मिरची वगैरे वृक्षांची लागवड आहे लाखो रुपये खर्च करून विहीर पाईपलाईन अशी शेतीसाठी लागणारी सिंचन व्यवस्था केली आहे वरील प्रमाणे वस्तुस्थिती असताना व नमूद मिळकतीतील सदरील नावे दाखल असणारे इसमाने या वर्षभरात आम्हास काहीही माहिती होऊ न देता काही मिळकतीची खुश खरेदीपत्र इतरांना करून दिलेली आहेत सदरील खरेदी पत्रांमध्ये अनेक मोठ्या राजकीय व्यक्तींचा व दलालांचा सहभाग आहे सदरील खरेदी पत्रांची नोंद होऊ नये म्हणून आम्ही त्याबाबत योग्य त्या महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केलेले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, प्राणतंधिकारी, जिल्हापोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रार अर्ज करून सुद्धा आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तरी मागासवर्गीय समाजाला न्याय मिळावा आम्हास न्याय न मिळाल्यास व शासनाने आमची दखल न घेतल्यास दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार आहे आणि तरीही न्याय मिळाला नाही तर आम्हाला सर्व शेतकरी कुटूंबाला आत्मदाहन करावें लागेल त्यास सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here