Home महाराष्ट्र पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप- भारतीय बौद्ध महासभेचा स्तुत्य उपक्रम

पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप- भारतीय बौद्ध महासभेचा स्तुत्य उपक्रम

124

✒️जिल्हा प्रतिनिधी(सिध्दार्थ दिवेकर)

रामगाव(दि.17ऑगस्ट):-रामगाव (रामेश्वर ) येथे झालेल्या भयंकर अतिवृष्टीमुळे तेथील गावाच्या मधोमध वाहणाऱ्या नदीला महापूर येऊन नदीकाठी वसलेल्या दोन्ही बाजूच्या मोहल्ल्यातील बौद्ध व इतर कुटुंबाचे घरामध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे त्यांचे घरातील अन्नधान्य, स्वयंपाक भांडी, कपडे व इतर साहित्य पुरामध्ये वाहून गेल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होऊन त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला याची सर्व माहिती समाज माध्यमाद्वारे सर्वत्र पसरली याची अतिशय गांभीयपूर्वक दखल दारव्हा येथील भारतीय बौद्ध महासभेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी घेतली.

मान्यवर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन बौद्ध समाजाच्या विविध व्हाट्सग्रुपवरील समाज बांधवांना पूरग्रस्त कुटुंबाना मदत करण्याचे विनंती वजा आवाहन केले. त्याला बहुसंख्य समाज बांधवांनी धम्मदान देऊन उत्तम प्रतिसाद दिला.धम्मदानरुपी मिळालेल्या रक्कमेतून दोन्ही मोहल्ल्यातील दोनशे पूरग्रस्त कुटुंबाकरिता संसार उपयोगी प्रत्येक कुटुंबाकरिता एक अश्या एकूण सहा सहा वस्तूचे दोनशे संच खरेदी केले. काल दिनांक 15ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पूरग्रस्त कुटुंबाला भारतीय बौद्ध महासभेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचे शुभ हस्ते (रामगाव रामेश्वर) दोन्ही बुद्ध विहारामध्ये भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व पूरग्रस्त कुटुंबातील सदस्य व भारतीय बौद्ध महासभा मान्यवर पदाधिकारी, समता सैनिक दल पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेच्या मान्यवर पदाधिकारी यांनी एक सामाजिक बांधिलकी समजून गावातील पूरग्रस्त समाज बांधवांना एक मदतीचा हात देऊन संकटातून सावरण्यासाठी जीवन उपयोगी भेटवस्तू देऊन आधार दिला.

गृहपोयोगी वस्तूंचे वाटप करण्यापूर्वी तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून, दीप प्रज्वलन करून त्रिसरण आणि पंचशील घेतले. या प्रसंगी संस्थेचे सरचिटणीस प्रा.डॉ.प्रशांत बागेश्वर यांनी प्रास्ताविक केले व उपस्थित बंधू- भगिनींचे सांत्वन करून धीर दिला. तालुका अध्यक्ष प्रा. सिद्धार्थ गायकवाड यांनी सुद्धा समारोपीय भाषण केले. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेने यापूर्वीही अनेक वैयक्तिक आणि सामूहिक विविध कारणांनी ग्रस्त असलेल्यांना मदत केली आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमोल कांबळे व विजय तायडे यांनी तर आभार प्रदर्शन महेंद्रकुमार अगमे यांनी केले. सरणतय गाथेनी कार्यक्रमाची सांगता केली. या प्रसंगी प्रा. सिद्धार्थ गायकवाड, प्रा. डॉ. प्रशांत बागेश्वर, डी. वाय. खडसे, शलिग्राम गवई, प्रा. अमोल कांबळे, प्रा.अरविंद मनवर, प्रा. आजाबरव खंडारे, प्रा. खुशाल ढवळे, राजू मनवर, विजय गजभिये, महेंद्र अगमे, साहेबराव इंगोले, सोनाजी खंडारे, विजय तायडे, जयकुमार कांबळे, अविनाश भगत, महेश चक्रे इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here