सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.11ऑगस्ट):- चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना राजुरा आणि जिवती येथील पोलिस पाटील पद भरती प्रक्रिया पार पडली त्यात जिवती तालुक्यातील गुडसेला येथे तीन उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले होते.त्यात मुलाखतीस पात्र उमेदवार अनिता रमेश कोडापे ह्या बाहेर गावच्या म्हणजेच मौजा भोलापठार त.जिवती चे रहिवाशी असून त्यांनी खोटे कागद पत्र सादर करून हा अर्ज केला आहे.
त्यांची योग्य तपासणी करून पद भरती करण्यात यावी अशी तक्रार दुसरे उमेदवार सौ. रितु संतोष कोडापे यांनी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी,राजुरा यांचे कडे केली.आज रितु संतोष कोडापे यांनी सांगितले की मी अनिता रमेश कोडापे यांचे रहिवाशी नसल्याचे सबळ पुरावे सादर करून ती या गावचे नाही हे सिद्ध केले असून हे पद अपात्र झाल्याचे उपविभागीय दंडाधिकारी साहेब राजुरा यांनी पत्राद्वारे कळविले आहे.त्यांनी पुढे सांगितले की खोटे कागद पत्र देणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांचेवर कार्यवाही झाली पाहिजे.आणि यासाठी मी निवेदन देणार असल्याचे सांगितले.




