Home महाराष्ट्र मणिपूरात राष्ट्रपती राजवट लावा, प्रदीर्घ जातीय हिंसाचार थांबवून शांतता पुनर्स्थापित करा

मणिपूरात राष्ट्रपती राजवट लावा, प्रदीर्घ जातीय हिंसाचार थांबवून शांतता पुनर्स्थापित करा

138

🔸जमाअत ए इस्लामी हिंद महिला विभागाने केली मागणी

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 5 ऑगस्ट):- जमाते इस्लामी हिंद च्या स्थानिक महीला विभागा तर्फे माणिपुर मध्ये महिलांवर होत असलेल्या अन्याय -अत्याचारा विरोधात तसेच प्रदीर्घ जातीय हिंसाचार थांबवून शांतता पुनर्स्थापित करणे साठी मणिपूर च्या राज्यपाल महोदय यांना या मागणी सह विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात मणिपूरमध्‍ये 3 मे पासूनहोत असलेल्या वांशिक हिंसाचार – दंगली मुळे चुराचंदपूर, मोइरांग आणि इंफाळ येथील मदत शिबिरांमधील पीडितां ची दयनिय अवस्था असून चिंता, अनिश्चिततेच्या कथा ऐकून मानव मन खरंच खूप हैराण आणि दु:खी होत आहे.

संघर्षाच्या सुरुवातीपासून दोन्ही बाजूंनी सुरू केलेल्या अभूतपूर्व हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या व्यक्तींच्या वेदना आणि दु:ख सर्व समुदायांमध्ये संताप आणि परकेपणाची भावना आहे.
ती विनाविलंब दुर होने आवश्यक आहे.

दिड शे हून अधिक मृत्यू, 5 शे हून अधिक जखमी, 5 हजार हून अधिक घरे जाळणे आणि अंतर्गत विस्थापन या दोन्ही समुदायांच्या लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यात केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश स्पष्ट होते. 60 हजारपेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहे.

गेल्या काही दिवसांत सातत्याने गोळीबार आणि घरांची जाळपोळ केल्याच्या बातम्यांवरून, गेल्या तीन महिन्यांपासून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात राज्य यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे.

मदत छावण्यांमधील स्थिती दयनीय आहे. विध्यार्थांच्या शिक्षणा साठी प्राधान्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विविध प्रवाहातील विद्यार्थ्यांना अनिश्चित भविष्याचा सामना करावा लागत आहे.

या साठी राज्य आणि केंद्र सरकारचे ठोस पावले उचलने गरजेचे आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सतत इंटरनेट बंदी असल्‍या मुळे अफवांना मदत होत आहे. अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.

सर्व प्रभावी उपाययोजना करून शांतता आणि एकोपा पुनर्संचयित करण्याची विनंती करत शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्यासाठी, बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अत्यंत निकडीचे असल्याचे निवेदना नमुद करत मृताना 15 लक्ष व जखमींना 5 लक्ष रुपयाची मदत /भरपाई द्यावी, नीजी धार्मिक स्थळे उद्धवस्त झाली व पाडण्यात आले, त्या सर्व देवस्थाना ची सरकारने स्वतःहून पुनर्बांधणी करावी.

बलात्कारा च्या प्रकरणा मध्ये न्यायासाठी होत असलेल्या विलंबामुळे बलात्कार्यांची हिंमत वाढत असल्याने येथील सर्व खटले राज्या बाहेर जलद गती न्यायालयात चालवून महिला सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित फाशी ची शिक्षा द्यावी, महामहीम राष्ट्रपतीकडे राष्ट्रपती राजवट लावण्याची सिफारस करावी.

अशा मागण्या मागण्याचे निवेदन महिला विभाग जमाते इस्लामी हिंद तर्फे दिली.यावेळी जमाती इस्लामी हिंद च्या महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here