जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
मुंबई(दि.28जुलै):-आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक नवीन युगाचा आविष्कार आलाय. अनेकांना हा उपयुक्त ठरतो आहे मात्र चुकीच्या लोकांच्या हातात हा आविष्कार पडल्यावर काय होते ते आज पाहूया !
तुम्हाला तुमच्याच परिवारातील किंवा परिचयातील एखाद्या व्यक्तीचा व्हिडीओ कॉल येतो अन “अचानक एक अडचण आलीय तर प्लिज मला वीस हजार रुपये पाठवून दे. मी एक दुसरा नंबर पाठवतो त्यावर जी पे कर ! उद्या बँकेतून काढून तुला लगेच परत देतो” असं तुम्हाला समोरची व्यक्ती म्हणते. अनेकदा ती व्यक्ती म्हणजे तुमचा जीवनसाथीच असतो. उदा. बायकोला जर नवऱ्याकडून असा कॉल आला तर बायको तरी कशाला जास्त खोलात जाईल न ? ती बिचारी लगेच नवऱ्याला वीस हजार रुपये जी पे करून मोकळी होते.
आणि संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला विचारते की, अचानक अशी काय अडचण आली वीस हजारांची मला मागितलेत ते , तेव्हा नवरा म्हणतो की,”मला कसली अडचण आलीय ? मी कशाला दहा हजार तुला मागू ? आणि मग बायकोचे धाबे दणाणते पायाखालची जामी सरकते आणि मग कळत की, तो व्हिडीओ कॉल नवऱ्याने केलाच नव्हता तर त्याचा फक्त फोटो वापरून आर्टिफिशियल इंटेलजन्सचा मदतीने ऍपद्वारे एडिट करून त्याच्या तोंडून ते शब्द उच्चारले गेलेत असं क्रिएट केलं जाते.
(ऍनिमेशन कसे केले जाते अन नंतर आवाज डब करून जोडला जातो तसे) आणि मग तुम्ही तो कॉल “खरा की खोटा” हे न पाहता पॅनिक होऊन पटकन पैसे देऊन बसता अन जाळ्यात अडकता. हे सायबर हॅकर लोक तुमच्या सोशल मीडियावरील हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असतात जेणेकरून त्यांच्याकडे तुमच्याबद्दलची आर्थिक / कौटुंबिक माहिती जमा केलेली असते आणि त्या आधारे ते सापळा रचतात. तुमचेच फोटो / व्हिडीओ / रिल्स डाऊनलोड करून घेऊन त्यात “एआय” च्या मदतीने बदल करून असे बनावट व्हिडीओ कॉल केले जातात. आणि आपलाच नेहमीच माणूस आहे असं समजून तुम्हीही फारशी बाकी खात्री न करून घेता पैसे देऊन मोकळे होता. आता गंमत म्हणजे इथं मी उदाहरण म्हणून वीस हजार रुपये सांगितले ! मात्र तुमच्या सोशल प्लॅटफॉर्मवर तुमची आर्थिक स्थिती कशी आहे हे सहज कळू शकते त्यावरून हीच वीस हजार ची रक्कम पन्नास हजार / लाखभर रुपये पण असू शकते. तुम्ही कौतुक म्हणून नवी कार घेतल्याचे, नवीन फ्लॅट घेतल्याचे, बँकॉक मलेशिया टूरचे फोटो सोशल वर टाकलेले असतात ते फक्त तुमची फ्रेंडलिस्ट मधील मंडळीच पाहतात असं नाही तर हे सो कॉल्ड व्हाईट कॉलर गुन्हेगार देखील पाहतात आणि त्यावर सापळा रचला जातो. ज्यात तुमच्या घरच्या लोकांच्या मदतीने तुम्हाला लुटलं जाते. आणि असे प्रकार वरचेवर वाढतील हा इशारा मी आताच देऊन ठेवतो. आजवर हनी ट्रॅप सारखे जे जे इशारे इन ऍडव्हान्स दिलेत ते ते नंतर सर्वाना प्रत्यक्षात पाहायला मिळालेत. तसाच हा बनावट व्हिडीओ कॉल चा धोका वरचेवर वाढणार आहे. हे सांगून ठेवतो. मग आता यावर उपाय काय ? तर सोप्पा उपाय आहे.
असा जर व्हिडिओ कॉल आला तरी काळजी करू नका. आणि मुख्य म्हणजे पॅनिक होऊ नका की अचानक आपल्या माणसाला असं काय संकट आलं की इतके पैसे लागत आहेत ? एकदम शांत राहा. त्या कॉल वर फार तर उत्तर द्या की, “ओके. पैसे पाठवतो / पाठवते” म्हणा अन कॉल कट करा. आणि नंतर समोरून ज्या व्यक्तीने कॉल केला होता त्याला तुम्ही तुमच्या मोबाईलवरून साधा कॉल करून विचारून घ्या की “काय अडचण आलीय पैशाची” तेव्हा आपोआप तुम्हाला कळेल की तो व्हिडिओ कॉल बनावट होता कारण तुमचा माणूस तुम्हाला सांगेल की “मी नाही कसला कॉल केलेला” आणि मग तुमची फसवणूक होण्याचा धोका राहणार नाही आणि समजा खरोखरच तुमच्या माणसाने व्हिडिओ कॉल तसा केला असेल तरी नंतर तुम्ही साधा कॉल केला तर तो सांगेलच की, “हो अडचण आलीय ! जरा पैसे पाठव” मग पैसे पाठवा वाटलं तर ! पण खात्री कसली न करता पैसे पाठवू नका आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियावर इतकं पण सगळं लोकांना दाखवत बसू नका की ज्यामुळे तुम्हीच नंतर हॅकरच्या हाती सापडाल.सोशल मीडिया या नावातच “सोशल” अपॆशीत आहे. पर्सनल नाही, हे लक्षात घ्या !
काळजी घ्या जागृत राहा असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी , सायबर अवेअरनेस फाऊंडेशनचे सदस्य धनंजय देशपांडे,पुणे यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.




