Home महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे झालेल्या मौजे बाळदी येथील शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करा–प्रहार’ जनशक्ती पक्ष

अतिवृष्टीमुळे झालेल्या मौजे बाळदी येथील शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करा–प्रहार’ जनशक्ती पक्ष

141

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो-9823995466

उमरखेड(दि.25जुलै):-दि.19 जुलै ते दि.22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उमरखेड तालुक्यातील बाळदी या परिसरा मध्ये कापूस,सोयाबीन,तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

या सर्व शेतक-यांचे झालेल्या पिक नुकसानीची तात्काळ पाहणी व पंचनामे करण्याचे तहसीलदार यांनी दखल घेऊन तातडीने मदत करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष शाखा बाळदि यांच्या वतीने करत आहो.तालुक्यात धुवाधार, ढगफुटी होऊन जोरदार पाऊस कोसळला.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जमिन खरडुन गेली आहे. स्थामुळे शेतकरी चिंतेने ग्रासलेला आहे.

मा.तहसिलदार,साहेब आपण त्वरित तलाठ्या मार्फत शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे नुकसानग्रस्त,पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यासाठी आदेश पारित करून बाळदी येथील प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे,यावेळी निवेदन देतांनी बाळदी शाखा प्रमुख प्रवीण इंगळे ,अविनाश दुधे, नितीन राठोड ,प्रफुल वानखेडे ,दीपक ठाकरे व आदी गावकरी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here