Home महाराष्ट्र चिमुरात प्लॉस्टीक पिशव्यांवरील बंदीचा उडालायं फज्जा-नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ !

चिमुरात प्लॉस्टीक पिशव्यांवरील बंदीचा उडालायं फज्जा-नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ !

134

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमूर(दि.25जुलै):-खेडयापासुन तर शहरापर्यंत गल्लोगल्लीत प्लॉस्टीक पिशव्यांचा वापर मोठया प्रमाणात होत आहे. परिणामी पर्यावरण प्रदुषीत होत असल्याने मानवी शरीरावर अपाय होत आहे. प्लॉस्टीक पिशव्यांवरील बंदीचा फज्जा उडाल्याचे दिसुन येत आहे.

प्रदुषणात होणारी वाढ थांबविण्याकरीता प्लॉस्टीक पिशव्या बंद करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्यानुसार ५० मॉयक्रानपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्या बंदी घालण्यात आली आहे. किरकोळ व्यापारी, साहित्य साठवणुक करणारे होलसेल विक्रेते जर प्लॉस्टीक पन्नीचा सर्रास वापर करीत असेल तर त्यांना दंड व सक्त मजुरीची तरतुदही शासनाने कायद्यात केली आहे. शासनाने आदेश काढून प्लॉस्टीक पिशवीला बंदी घातली मात्र ही बंदी हवेतच विरल्यासारखी दिसुन येत आहे. दुकानदार या आदेशाचे उल्लंघन करून प्लॉस्टीक पिशव्यांचा वापर सर्रास करीतच आहे.

कमी जाडीच्या पिशव्यांची परप्रांतातुन राज्यात मोठया प्रमाणात आयात होत आहे. त्यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याने पर्यावरण विभाग, पर्यावरण मंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. शासन आदेश पायदळी तुडविले जात आहे. विक्रेते, व्यापारी मोठया प्रमाणात अद्याप प्लॉस्टीक पिशव्यांचा वापर करीत आहेत. नागरिकही हक्काने त्यांना प्लास्टिक पिशवी/पन्नी मागत असतात. त्यामुळे प्लॉस्टीक बंदीचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. संबंधीतांवर कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही. त्यामुळे संबंधीत अधिकारी, कर्मचारी आणि दुकानदाराचे साटेलोटे तर नाही ना ? अशी शंका निर्माण होत आहे.

नगर परिषद चिमुर परिसरात प्लॉस्टीक पिशव्यांचा वापर होतांना दिसत आहे. बाजारात ग्राहक सर्रास प्लॉस्टीक पिशव्यांची मागणी करतात. प्लॉस्टीकचा कचरा वाढु लागल्याने शासनाने त्यावर बंदी आणली. परंतु त्यानंतरही शासकीय यंत्रणेकडुन अंमलबजावणी होत नसल्याने प्लॉस्टीकच्या वापरावर नियंत्रण आले नाही. वजनाने हलक्या असल्याने प्लॉस्टीक पिशव्या हवेबरोबरच वाहत जावुन पाणीसाठे, जंगल आणि जमिनीवर साचतात. मोकाट जनावरे, जलचर प्राणी अन्न समजुन या प्लॉस्टीक पिशव्या गिळतात. आतड्यात प्लॉस्टीक साचल्याने त्यांचा मृत्यु होतो. पावसाळयात प्लॉस्टीक पिशव्यामुळे गटारे कोंबुन पाणी साचते. डबके निर्माण झाल्याने डासांची पैदास होवुन रोगराई निर्माण होते.

ऐवढेच नाही तर प्लॉस्टीकमधील पॉलीमर्स जमीन, पाणी व अन्नसाखळी दुषीत करतात. ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक बाब आहे. त्यासाठी प्लॉस्टीक पिशव्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्लॉस्टीकच्या अति वापराने आज विविध समस्या निर्माण झाल्या आहे. प्लॉस्टीक हे नाशवंत नाही. त्यांचे विघटन होत नाही. याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. त्यासाठी प्लॉस्टीकच्या अनिर्बंध वापरावर अंकुश ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी जागरूक राहत कापडी पिशव्या वापरणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here