जळगाव :- मणिपूर येथे गेल्या ८५ दिवसांपासून सलग हिंसा होत असून सुमारे ३०० लोक त्यात मृत्युमुखी पडले असून १५०० लोक जखमी झाले आहेत , काही महिलांची नग्न धींड काढण्यात आली आहे , अत्यंत भयग्रस्त होवून हजारोंच्या संखेने लोक अन्य राज्यात निघून जात आहेत , तिथं कायदा व सुव्यवस्था पूर्णतः कोलमडली असल्याने तेथील सरकार बर्खास्त करुन राष्ट्रपति राजवट लागू करावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रपतिंना जळगाव जिल्हाधिकारी यांचे मार्फत अनुसूचित जाती , जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समिती , जळगाव तर्फे उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी भारदे यांना देण्यात आले .
समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे , साहित्यिक जयसिंग वाघ , रमेश सोनवणे , दिलीप सपकाळे , सोमा भालेराव , सुरेश तायड़े , साहेबराव वानखेडे , हरिश्चंद्र सोनवणे , महेंद्र केदारे , प्रा.प्रितलाल पवार , चंद्रकांत नंनवरे , वाल्मीक सपकाळे , संजय सपकाळे , युवराज सुरवाड़े व अन्य पदाधिकारी हजर होते .




