Home महाराष्ट्र अपयशातून बाहेर येण्यासाठी विद्यार्थ्यांना लवचिकता चिकाटी धारण करून यशापर्यंत पोहचावे : डॉ...

अपयशातून बाहेर येण्यासाठी विद्यार्थ्यांना लवचिकता चिकाटी धारण करून यशापर्यंत पोहचावे : डॉ .प्रताप पाटील

148

 

इसलामपूर दि (प्रतिनिधी)
इकबाल पीरज़ादे
अपयशातून रबराच्या बॉल प्रमाणे उसळी मारून परत यशाकडे वाटचाल करण्यासाठी जशी लब्रा सारखी लवचिकता लागते तशीच पुन्हा झगडण्याची हिंमत व चिकाटी असावी लागत असल्याचे मत पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील यांनी व्यक्त केले
ऐतवडे खुर्द येथील वारणा शिक्षण समूहाच्या वतीने शाळेचे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर राज्य शासनाने घेण्यात आलेल्या पोलीस भरतीमध्ये शाळेतील चार माजी विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल वारणा शिक्षण संकुलाच्या वतीने त्यांचा डॉ प्रताप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर पाटील बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी वारणाशिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी टी पाटील होते
स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगड न पाळता ध्येय ठेवून वाटचाल केल्यास नक्कीच यशस्वी व्हाल असे मत व्यक्त केले
अध्यक्ष पी टी पाटील म्हणाले शालेय जीवनातच यशस्वी होण्यासाठी चांगल्या संस्काराची गरज असून विद्यार्थ्यांनी कोणत्याही वाम मार्गाने न लागता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून आपले जीवन आनंदमय केल्यास आपल्या आई वडील व गुरूंना त्यांचा सार्थ अभिमान वाटेल असे मत व्यक्त केले या मेळाव्यासाठी हजारो माजी विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी संस्थेचे विश्वस्त आप्पासो खराडे बाबासो पाटील बाबासाहेब सावर्डेकर जगन्नाथ पाटील सयाजी पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते
या मेळाव्याचे प्रास्ताविक व स्वागत प्राध्यापक सुरेश इंगळे यांनी तर शेवटी आभार भारत उपाध्ये यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here