रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
वरोरा- बुद्ध जयंती उत्सव समिती तक्षशीला बुद्ध विहार इंदीरा नगर बोर्डा वरोरा द्वारा बुद्ध जयंती महोत्सव अध्यक्ष मा.संजय गायकवाड साहेब, उद्घाटक विणाताई लोनबले मॕडम, सुधाकर चौखे सर,गजभिये सर, अमर गोंडाने साहेब, प्रतिभा कातकर मॕडम, मालके, दाक्षीयणी रामटेके मॕडम, तेलंग सर, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक रामचंद्र सालेकर (राज्य उपाध्यक्ष डाॕ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र) हे प्रमुख मार्गदर्शक होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘बुद्ध धम्माचे तत्वज्ञान व आजची परिस्थिती’ यावर प्रकाश टाकतांना, बुद्ध कोण होते ? त्यांनी मानव जातीसाठी काय केले ? बुद्धाचा धम्म म्हणजे काय? धम्माच तत्वज्ञान काय होतं?मानवाच्या दुःखाच कारण व त्यावर उपाय सांगणारा मानव जातीचा कल्यानकारी धम्म भारतातून कसा व कोणी नामशेष केला ? यावर सांगोपांग मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ते म्हणाले की ,शाक्य गणाचा म्हणजे शेती करणाऱ्यांचा म्हणजे आजच्या शेतकऱ्यांचा म्हणजे कुणब्यांचा राजा शुद्धोधनाचा पुत्र, म्हणजेच या भुमीचा भुमिपुत्र,महामाया देवीच्या पोटी जन्माला आलेला कोणी दुसरा परखा नसून तुमचा आमचा सर्व बहुजनांचा हा बुद्ध आहे..
महामायादेवी आपल्या माहेरी प्रसुतीसाठी जात असतांना वाटेतच एका खुल्या आकाशात मिगदाय वनातील लुंबीनी या उद्यानात जन्माला आले.अवघ्या सात दिवसात आईला पोरका झालेल्या या बाळाचा प्रजापतीदेवी या सावत्र आईने मोठ्या वात्सल्याने सांभाळ केला.या बाळाच नाव ठेवण्यात आलं सिद्धार्थ याचा अर्थच असा आहे की ज्याने आपल्या जीवनाचा अर्थ म्हणजे उद्दिष्ट सिद्ध सफल वा साकार केले अशा कृतार्थ मानवाला सिद्धार्थ म्हणतात.
सिद्धार्थाला गौतम असे म्हणतात गौतम हे संस्कृत रुप आहे याच पालीरुप आहे गोतम, गोतमचा अर्थ आहे गो म्हणजे गायी तम म्हणजे आत्यंतिक विपुलता गायी बैलांची विपुल खिल्लारे असलेल्या गोतम घराण्यात जन्माला आलेला.
बुद्ध म्हणजे स्वतःला, इतर मानवांना आणि मानवेत्तर अशा समग्र बाह्य सृष्टीला निट जानणारा यात प्रज्ञा शिल करुणा या तिनही घटकाचा मिलाफ एकत्र अस्तित्व असणारा होय.
बुद्धाला तथागत असे ही म्हणतात – तथ्य म्हणजे सत्य, सत्यापर्यंत पोहचालेला. ज्याने यथार्थ ज्ञान प्राप्त केले आहे तो तथागत.
बुद्धपुर्व काळात सहा हजार वर्षपुर्वी या देशात एक संमृद्ध अशी संस्कृती नांदत होती. तिला आपण सिंधु किंवा शिव संस्कृती असे म्हणतो.या संस्कृतीचे शिव बळी चार्वाक बुद्ध…. हे सगळे वारस होत. ही आपली मातृसत्ताक निसर्गपुजक संस्कृती होती. म्हणूनच आपण आपल्या देशाला भारत माता असे म्हणतो. याचे पुरावे हडप्पा महेंजदारो या उत्खननात सापडले आहे. त्या काळी वर्ण जातीपाती धर्म असं काही नव्हतं तर फक्त गणव्यवस्था होती.परंतु गाणात भेदभाव विषमता नव्हती रोटीबेटी व्यवहार होत.सिद्धार्थ गौतम बुद्धाचे वडीलशुद्धोधन शाक्य गणाचे तर आई महामायादेवी कोलीया गणाची होय. त्या काळी ही प्रत्येक गण आपल्या वर्चस्वासाठी एकदुसऱ्या सोबत लढायचे यातून युद्ध व्हायचे शाक्य व कोलीया गणात युद्ध झाले तो रक्तपात बघून राजपुत्र गौतम बुद्ध यांच्या मनावर खोल परिणाम झाला व त्यांनी आपला संसार सर्व वैभव त्यागून गृहत्याग केला व मानवाच्या दुःखाच कारण शोधावयास चारिका करत राजगृह ते बोधगया येथे आले. त्यांनी तिथे ध्यान साधना केली त्यांना तिथे बोधीप्राप्त झाली. त्यांना दुःखाच कारण सापडलं त्यावरील उपाय सुद्धा सापडला. दुःखाच मुळ कारण आहे तृष्णा म्हणजेच दुष्प्रवृत्ती लोभ, मानसाला दुःखमुक्त करण्याचं तत्वज्ञान म्हणजे बुद्धाच तत्वज्ञान.
त्यासाठी त्यांनी सांगितलेला अष्टांग मार्ग –
समता,न्याय,स्वातंत्र्य,बंधुता(मैत्री),प्रज्ञा शिल, करुणा,समाधी.
आदार्श समाज निर्मितीसाठी पंचशीलाचे पालन करण्याचा उपदेश केला ते म्हणजे – १) पानातीपाता वेरमनी शिक्खा पदम समाधीयामी ।
याचा अर्थ मी कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाही.
२)आदीन्नदाना वेरमणी सिक्खा पदम समाधीयामी ।
म्हणजेच चोरी कींवा लबाडीने दुसऱ्या ची मालमत्ता संपादू नये.
३) मुसावादा वेरमनी सिक्खा पदम समाधीयामी ।
– असत्ये भाषणापासून अलिप्त राहीन.खोट बोलणार नाही.
४)सुरामेरय मज्ज पमादठाना वेरमणी सिक्खा पदम । -मादक पेय्यापासून अलिप्त राहणे.
५)कामे सुमेच्छारा वेरमनी सिक्खा पदम समाधीयामी – मी कामवासनेपासून अलिप्त राहने. पुढे राजा बिंदुसार च्या पुढाकाराने
पिटक (त्रिपिटक) हा तीन भागात चौऱ्यांशी हजार धम्मस्कंद असलेला धम्मग्रंथ पाली भाषेत बुद्धाच्या धम्म तत्वज्ञानावर लिहील्या गेला. यामध्ये -सुतपिटक-समाज आदर्श कसा करता येईल यासाठी मार्गदर्शन
-विनयपिटक-आदर्श समाजासाठी पाळावयाचे नियम अधिकार व कर्तव्य (आचारसंहिता), अभिधम्मपिटक – आदर्श मानवीय धारणा धारण करण्यासाठी परिपुर्ण मनोवैज्ञानिक मार्गदर्शन आहे.
आजचा भागवत संप्रदाय हा बुद्ध तत्वज्ञानाचा पाया असलेला संप्रदाय असून या संप्रदायाच्या अनुयायांना वारकरी म्हणतात. त्यामुळेच वैदीकांनी वारकरी संप्रदायाला बहिकृत केलं आहे. याच कारण भागवात संप्रदाय मुळ बुद्ध तत्वज्ञानावर उभा आहे. पंढरीचा पांडूरंग हा बुद्ध आहे. वारकऱ्यांची पायी दिंडी म्हणजे ही बुद्धांची चारिका आहे. वारीच्या मार्गा मार्गावर होणारे किर्तन म्हणजे आदर्श समाजासाठी धम्मोपदेश आहे.
म्हणुनच बुद्धांच्या तत्त्वज्ञानानुसार अनेक संतांनी वैदीकांच्या दैववादाला मुर्तीपुजेला कर्मकांडांना नाकारलं आहे. त्यांनी त्यांच्या अभंगात बुद्धाचे गुणगान गायले आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात..
तोडावया अवघा । चेष्टांचा संबंध । ।
शुद्धापाशी शुद्ध । बुद्ध व्हावे । ।
संत नामदेव म्हणतात,
बुद्ध अवतारी । आम्ही झालो संत ।
वर्णावया मत । नामा म्हणे । ।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,
हाती न घेता तलवार । बुद्ध राज्य करी जगावर । ।
कारण एक । प्रभावी प्रचार। ।
अडीच हजार वर्षापुर्वी संपुर्ण अखंड भारत हा बुद्धमय होता. सम्राट अशोकांनी त्रिपीटकातील चौऱ्यांशी हजार धम्म स्कंद्ध डोळ्यासमोर ठेवून या देशात चौऱ्यांशी हजार बुद्ध विहार निर्माण केले. सम्राट अशोकाच्या काळात संपुर्ण अखंड भारत बौद्धमय होता. सुखी संपन्न होता,३३% जीडीपी होता म्हणून मौर्य सम्राट अशोकाच्या भारताला सोन्याची चिडीयाॕ म्हणत, सुवर्णयुग म्हणत, या देशातून सोन्याचा धुर निघत असे म्हणतात याचाच अर्थ भारत सुखी समृद्ध संपन्न होता. विश्वातलं विद्देच माहेरघर म्हणून भारताची ओळख होती, तक्षशीला, नालंदा..सारखी मोठमोठी विश्व विद्यापीठ होती. जगातून लोक येथे शिक्षण घेण्यासाठी येत. परंतु वैदीकाचा नायक पुश्यमित्र शुंग याने शेवटचा मौर्य सम्राट ब्रह्दरथ याला मारुन बुद्ध धम्म या देशातून संपविला. विरोध करणाऱ्या बहुजन महानायकांना कपटाने संपविले, विश्वविद्यापीठ नष्ट करुन बहुजनांवर शिक्षण बंदी आणून गुलाम केले. पुढे वैदीकांनी बुद्ध विहारांना विदृप करुन बुद्धांच्या मुर्त्यांना शेंदूर फासून वेगवेगळे त्यांचे काल्पनिक तथा आपल्या कपटाने मारल्या गेलेल्या माहानायक महानायीकांचे देव बणवून त्यांना गाभाऱ्यात बसवून त्यावर भाकडकथा पोथीपुराण लिहून कर्मकांड रचून त्याला मंदीर नाव देवून आपलं शोषण सुरु केल ते आजतागायत सुरु आहे. भारतीयांच्या मनात प्रभावी असलेला बुद्ध धम्म नष्ट करता येत नाही हे जेव्हा वैदीकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी बुद्ध धम्मातीलच गोष्टी चोरुन त्याचं विदृपिकरण करुन वैदीकांनी बहुजनांना धम्मापासून दूर नेल.
सनातन म्हणजे अती प्राचीन धम्म हा सर्व धर्मापेक्षा फार अगोदरचा आहे त्रिपिटकात या शब्दाचा उल्लेख आला आहे. हा शब्द धम्मातूनच चोरुन आज आपल्यावर वेगळ्या पद्धतीने लादत आहे.
*भगवा* हा बुद्धांसाठी पाली वाङमयात गोतम बुद्धांना उद्देशून पूनः पुन्हा वापरण्यात आलेला आणखी एक शब्द. भगवा या शब्दाचा अर्थ आहे उत्तम गुणांनी संपन्न’ या शब्दाचे मुळ रुप भगवत् असे आहे. भगवा हे त्याचे प्रथमा विभक्तीमधील एकवचन होय. संस्कृतमध्ये ‘भगवान’ असे रुप वापरले जात असले तरी पालीमध्ये ‘भगवा’ हेच रुप वापरले जाते. मुळ तिपिटकामध्ये हा शब्द ८७५८ वेळा आला आहे. तिपिटक अट्ठकथा,आणि टीका या सर्व ग्रंथाचा एकत्रीत विचार केला तर तो १७९४२ वेळा आला आहे.
*’भगवा’* हा शब्द गोतम बुद्धांना उद्देशून इतक्या वेळा वापरला गेला आहे आणि दुसरीकडे तो एका रंगाच द्दोतक आहे. या दोन गोष्टींचा एकमेकांशी अत्यंत जवळचा संबध आहे. विविध गुणांनी संपन्न या अर्थाने वापरला जाणारा भगवा हा शब्द गोतम बुद्धांचा धोतक होता. त्यांचे चीवर म्हणजे भिक्खूंनी वापरावयाचे वस्त्र रंगीत होते.बौद्ध भिक्खूंचे चीवर ज्या ज्या रंगांमध्ये असते,त्या रंगापैकी भगवा हा एक महत्त्वाचा रंग आहे.गोतम बुद्धांना उद्देशून वापरला जाणारा भगवा हा शब्द काळाच्या ओघात लक्षणेने त्यांच्या चीवराचा रंग दर्शवण्यासाठी वापरला जावू लागला आणि मग ‘भगवा’ हा शब्द एका रंगाचा द्दोतक बनला.
पुढच्या काळात गोतम बुद्धांचा विचार अत्यंत प्रभावी झाला.प्रभावी विचार प्रत्यक्ष घाव घालून खोडता येत नसेल तर तो आपलाच आहे असे म्हणून त्याला पचवून टाकायचे आणि त्याला आपल्या चौकटीमध्ये बसवून पराभूत करायचे हा त्यांचा नेहमीचा डावपेच वैदिकांनी येथेही वापरला.गोतम बुद्धांना पचविण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणूनच वैदिकांनी भगवा हा शब्द स्वीकारून तो आपल्या संस्कृतीचा मानबिंदू बणवला आणि गोतम बुद्धावरील प्रेमामुळे भगव्या रंगाविषयी आदर असलेला बहुजन समाज नकळत वैदिक संस्कतीशी जोडला गेला हळूहळू बुद्धांपासून तुटून वैदिकांच्या बंधनात अधिकाअधिक अडकत गेला.आज बुद्धाचा भगवा वैदीकांनी त्यांचा आज मानबींदु बणवून आज हाच बुद्धाच्या समतेचा भगवा झेंडा आम्हा बहुजनांच्या खांद्यावर देवून विषमतेचं जहर पाजून मज्जीदी पाडायसाठी वापर केल्या जातो.
*भगवान* शब्द एकाही हिंदु धर्मग्रंथात ईश्वरासोबत लावलेला नव्हता. भगवान हे शिर्षक मनुष्यासाठी बुद्धामुळे बणलेलं होतं, त्यामुळे देवता मनुष्यापेक्षा कनिष्ट गणल्या जावू लागल्या कारण देवता ह्या विलाशी आहे तर मनुष्य श्रेष्ठ आहे कारण तो कर्मयोगी आहे. तो महान त्यागसुद्धा करु शकतो.मोठ मोठ्या आदर्शासाठी बलीदानसुद्धा देवू शकतो म्हणून मनुष्य भगवान आहे. जेव्हा भगवान बुद्धासोबत भगवान शब्द जोडल्या जाऊ लागला तेव्हा ईश्वरवादी वैदीक वाटच बघत असते त्यानेही भागवत… इ ग्रंथामध्ये त्यांच्या सर्व देवतांसोबत भगवान शब्द जोडून टाकला. बौद्ध तत्त्वज्ञानानुसार भगवान शब्दाचा अर्थ जो विश्वातल्या सर्व दुःखाला आणि दुःखी लोकांना दुःखातून मुक्त करण्यासाठी उद्धार करण्यासाठी संकल्प करेल तो भगवान होतो.ईश्वर कधीच भगवान नसतो. परंतु ईश्वराला चालवायसाठी मानसाची पदवी देवतांना जोडली.
*आर्य* दहा आर्य सत्ते त्रिपिटकात सांगितले आहे हा आर्य शब्द वैदिकांनी या धम्मातूनच घेतला व आम्ही या परके नसून या भुमीतलेच आहो हे दाखवण्यासाठी स्वतःला आर्य संबोधू लागले.
अशाप्रकारे बौद्धमय भारत हा बौद्ध धम्माची चोरी करुन त्यांच्या विचारांच विदृपीकरण करुन विषमतावादी अवैज्ञानिक वैदीक हिंदु राष्ट्र करण्यात वैदीक यशस्वी झाले परंतु या देशाला महासत्ता विश्वगुरु बणविण्याची ताकद हिंदुत्वात नसून बुद्धत्त्वच आपल्याला विश्वगूरु बणवू शकते.
डाॕ.बाबासाहेबांनी आंबेडकरांनी परत भारताला बौद्धमय करण्याची प्रतिज्ञा केली ती सफल करण्यासाठी समता न्याय स्वातंत्र्य व बंधुता या बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानावर तयार करण्यात आलेले संविधान देशाला दिले हाच खरा बुध्दमय भारत होय. परत हे वैदीक , धम्माच तत्वज्ञान असलेलं आपलं संविधान बदलविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असून मनुस्मृती परत आपल्यावर थोपवून या बहुजन समाजाला गुलाम करु पाहत आहे तरी बहुजनांनी सावध असावे असे प्रतिपादन रामचंद्र सालेकर यांनी आपल्या एक तासाच्या व्याख्यानात केले.
कार्यक्रमाचे संचालन पाटील सर यांनी तर आभार तेलंग सरांनी मानले.




