(प्रतिनिधी अनिल साळवे )
जिल्ह्यातील पूर्णा नगर परिषद अंतर्गत पंतप्रधान व रमाई आवास घरकुल योजनेत झालेली अनियमितता आणि निराधारांच्या मानधानात ५ दरमहा हजार रूपये वाढ व्हावी, या प्रमुख मागण्यासाठी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्र मंडळाचे पूर्णा शहराध्यक्ष माजी नगरसेवक मुकूंद विठ्ठल भोळे, मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे तालुकाध्यक्ष अंकुश बालाजी मांजरे, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव मुंजाजी सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परभणी येथे उपोषण सुरू केले होते.
घरकुल योजनेत स्थळ पाहाणी न करता मनमानी पद्धतीने धनादेश वाटप करण्यात आले आहेत. त्यासाठी नांदेड येथील कुशाग्र असोसियट प्रा.लि. कंपनीचे प्रमुख माधव लक्ष्मण वाघमारे यांच्याशी नगर परिषदेचे अभियंता स्नेहल गाडेकर व महसूल सहाय्यक संदीप महादेव फड यांनी संगनमत करून लाखो रूपयांची भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे खरे लाभार्थी घरकुल योजने पासून वंचित राहिले आहेत. लक्ष्मीदर्शन झाल्याशिवाय अधिकारी कामे करीत नाहीत. त्यामुळे राज्य शासनाची योजना बदनाम होत असून भ्रष्टाचार वाढला आहे. कर्मचारी संदीप फड यांची गेल्या सात वर्षांपासून कुठेही बदली झालेली नाही. ते सामान्य लोकांना मग्रुरीने बोलतात. अंहकारी वृत्तीने वागवतात, असाही आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
उपोषणाची माहिती मिळताच गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी थेट परभणी गाठली आणि उपोषणास पाठिंबा देऊन सहभागी झाले. सुमारे चार तास उपोषणास बसलेल्या आ.डॉ.गुट्टेंना पाहून अधिकाऱ्यांची धावपळ वाढली. पुढे काही वेळेत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपोषणस्थळी पोहोचली. त्यामुळे अधिकारी उपोषणस्थळी धावले. त्यानंतर आ.डॉ.गुट्टे, अधिकारी आणि उपोषणकर्ते यांच्यात सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे मागण्यांची योग्य ती दखल घेवून जिल्हास्तरीय चौकशी समिती तयार करून कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मिळाल्याने आ.डॉ.गुट्टे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी पाजून उपोषण स्थगित करण्यात आले.
पूर्णा नगर परिषद अंतर्गत पंतप्रधान व रमाई आवास घरकुल योजनेत स्थळ पाहाणी न करता संबंधित अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने धनादेश वाटप झाले. तसेच अनेक कामात अनियमितता झाली आहे, असा आरोप करून
त्याची माहिती मिळताच गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी उपोषण स्थळी भेट दिली. त्यानंतर अधिकारी व उपोषणकर्ते यांची चर्चा घडवून मध्यस्थी केली.
यावेळी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्यासह मित्रमंडळाचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, जिल्हासरचिटणीस रवी कांबळे, जिल्हा संपर्क संपर्कप्रमुख संदीप माटेगावकर,तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूदेव मुंडे, माजी नगराध्यक्ष मुकुंद भोळे, जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी, मित्रमंडळाचे पदधिकारी, कार्यकर्ते व उपोषणकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने अंत पाहू नये, अन्यथा जनक्षोभ उसळेल
घरकुल योजनेत झालेला भ्रष्टाचार लोकांच्या रोषाचे मुख्य कारण आहे. तसेच नगर परिषदेत लोकांना अपमानास्पद वागणूक मिळात आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांच्या मागण्याचा सकारात्मक विचार करून प्रशासनाने कडक कारवाई करावी, अन्यथा जनक्षोभ उसळेल. त्यामुळे लोकांना प्रशासनाने अंत पाहू नये, असा स्पष्ट इशारा आ.डॉ.गुट्टे यांनी दिला आहे.
सामूहिक संघटन हाच उपाय…
प्रशासन जर अरेरावीची आणि मग्रुरीची भाषा करीत असेल तर, लोकांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. त्याच भावनेतून उपोषणात सहभागी झालेले आ.डॉ.गुट्टे गोरगरीबांचे कैवारी आहेत. त्यामुळे त्यांनी कर्तव्यदक्षता कायम जपली आहे. म्हणून उपोषणास बळ मिळालं आहे. मात्र, प्रशासनाच्या मनमानीस चपराक देण्यासाठी सामूहिक संघटन हाच रामबाण उपाय आहे, असे मत मित्र मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर यांनी मांडले.




