अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.12मार्च):-छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील लोक कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे परंतु आजचे राज्यकर्ते केंद्रातले असो का राज्यातली असो लोक कल्याणकारी तर सोडाच संविधान निर्माण केलेली लोकशाही मोडकळीस काढण्याचा घाट राज्यकर्ते करत आहेत याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे कुठल्याही गुन्ह्याशिवाय तक्रारी विना सदानंद कदम इडी च्या माध्यमाने अटक करून लोकशाही व संविधानाला बगल दिली आहे केंद्रातील भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे सरकार लोकशाही मोडकळीस काढण्याच्या मार्गावर आहेत आणि हळूहळू हुकूमशाहीकडे देशाला नेत आहेत म्हणून जागर नागरिकांनी जागृत होण्याचे गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेता सुषमाताई अंधारे यांनी गंगाखेड येथील शिवजन्म उत्सव निमित्त शिवगर्जना कार्यक्रमात बोलत होत्या.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या वतीने शुक्रवार रोजी शिवजन्मोत्सवानिमित्त शिव व्याख्यानाचे आयोजन केले होते व्याख्यात्या म्हणून शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे उद्घाटक म्हणून खासदार संजय जाधव अध्यक्षस्थानी आमदार राहुल पाटील यांच्यासह व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम रिपाई नेते सिद्धार्थ भालेराव आयोजक उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटे शिक्षक सेनेचे राज्य सचिव बाळासाहेब राखे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गोविंद यादव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मिथिलेश केंद्रे रिपाईचे युवा नेते धम्मानंद घोबाळे काँग्रेस युवक चे सरचिटणीस प्रणित खजे प्राचार्य मुंजाजी चोरघडे, वंचित बहुजन आघाडीचे दिगंबर घोबाळे तालुकाप्रमुख अनिल सातपुते पंचायत समिती सदस्य जानकीराम पवार शहर प्रमुख जितेश गोरे समाजवादी पार्टीचे शेख उस्मान आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अंधारे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी राज्यकर्त्यांना जनतेच्या समस्येविषयी जाणीव असणे आवश्यक आहे हल्ली भाजप सरकारने सर्वसामान्य माणसाच्या तोंडाला पाणी पुसून हुकूमशाही चालू होत आहेत देशात तुमच्या निर्माण न होण्यासाठी मोदी सरकार राज्यातील शिंदे सरकार ने अवतार करावा अन्यथा देशामध्ये हुकूमशाहीचा उदय होईल याची काळजी श्री गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा l लोकशाही संपुष्टात येऊन हुकुमशाही येईल म्हणून मोदी सरकार मींदे सरकार नागरिक नी जागरूक होऊन पाय उतार करावे
परभणी जिल्ह्यातील नागरिक ठाकरे कुटुंबीयांवर प्रेम करतात-खासदार बंडु जाधव यावेळी खासदार बंडू जातो बोलताना म्हणाले की परभणी जिल्हा हा शिवप्रेमी बाळासाहेब ठाकरे खऱ्या अर्थाने शिवसेने ला धनुष्यबाण चिन्ह देणारा परभणी जिल्हाच आहे म्हणून परभणी जिल्ह्यातले नागरिक ठाकरे कुटुंबीयांवर प्रेम करतात म्हणूनच शिवसेनेमध्ये कुठलेही गद्दारी परभणी जिल्ह्यात झाली नाही परभणी जिल्हा अभेद आहे.यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील गोविंद यादव यांनी विचार मांडले प्रस्ताविक आयोजक विष्णू मुरकुटे यांनी आभार बाळासाहेब राखे सूत्रसंचालन पदुदेव पालमकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीते साठी युवा सेनेचे संदीप राठोड भागवत शिंदे सिद्धेश्वर आंधळे स्वप्निल राठोड सुशील पाळवदे पांडुरंग पाळवदे अक्षय आंधळे सिद्धेश्वर मुरकुटे, धोंडीराम जाधव इंद्रजीत हाके परमेश्वर घुले राजाराम पवार आधी शिवसेना युवा सेना शिक्षक सेना पदाधिकारी यांनी घेतले




