संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे आर डी पाटील आणि मिलिंद पवार यांचा आरोप !
धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)
धरणगाव(दि.9फेब्रुवारी):-स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे धरणगाव तालुकाध्यक्ष रमेश धुडकु पाटील व त्यांची कार्यकारणी पुर्वीप्रमाणे कायम आहे. यामधे कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दि. ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी निवडण्यात आलेली नविन कार्यकारणी हि बेकायदेशिर असून काही ठरावीक लोकांच्या सांगण्यावरून बदल घडवून आणलेला आहे. सदर मीटिंग च्या अजेंड्यावर अध्यक्ष व सचिव यांची स्वाक्षरी बंधनकारक असताना देखील अध्यक्ष/ सचिव यांच्या अनुपस्थित मीटिंग आयोजित केली आहे. ]
धरणगाव : धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची दि. ६ फेब्रु, २०२३ रोजी घेण्यात आलेली मिटिंग बेकायदेशीर असल्याचा आरोप एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आला आहे. अध्यक्ष आर. डी. पाटील सचिव मिलिंद पवार यांनी हे संयुक्त प्रसिद्धी पत्रक काढले आहे. सदर मिटिंग ही सदस्यांना विश्वासात न घेता खोटे आश्वासन देऊन आपल्या मर्जीतल्या लोकांची निवड करून घेण्यात आली. आगामी काळात दुकानदाराच्या समस्या व शासनाच्या धोरण विरोधात होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी सदरची मिटिंग आयोजित करण्यात आली होती.
परंतु सदरच्या मिटिंगमध्ये धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची कार्यकारणी बदल करण्यासंबंधी कोणताच विषय नसताना सुद्धा त्यावर चर्चा घडवून नविन कार्यकारणी जाहीर करण्यात आल्याचा आरोप देखील प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे. सदर मिटींग ही संघटनेच्या कोणत्याच पदाधिकारी यांनी बोलावली नव्हती व कार्यकारणी बाबत काही तक्रारी असल्यास किंवा पदाधिकारी (अध्यक्ष उपाध्यक्ष, सचिव ) बदलाबाबत संघटनेकडे कोणत्याही सभासदाने अगर पदाधिकारी यांनी लेखी तक्रारी केलेल्या नाहीत. सदर मिटिंग ही अध्यक्ष / सचिव यांच्या स्वाक्षरी ने घेतलेली नाही सदरचा मिटिंग अजेंडावर अध्यक्ष / सचिव यांची सही असणे ही कायदेशीर तरतूद असते.
त्यामुळे इतर कुणीही मिटिंग बोलवत असेल तर ती सहकार कायद्यात बसत नाही. तरी नुकतीच घेण्यात आलेली मिटिंग ही अध्यक्ष /सचिव यांनी बोलविल्यानंतरच ग्राह्य धरण्यात येईल. धरणगाव तालुका संघटनेची नवीन कार्यकारणी बाबतची मिटिंग ही बेकायदेशीर असून नेमलेली कार्यकारणी सुद्धा बेकायदेशीर आहे. या मिटिंग अजेंड्यावर विषय सूची नव्हती. विषय सूचीवर कार्यकारणी बदलाबाबत विषय ठेवण्यात आला नव्हता. यथावकाश विषय सूचीवर बदलाबाबतचा विषय ठेवण्यात येईल आणि त्यावर चर्चा होऊन अंतिम निकाल झाल्यावर नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येईल. त्यामुळे दि. ६ रोजी घेण्यात आलेली मिटिंग ही बेकायदेशीर असून निवडण्यात आलेली नवीन कार्यकारणी ही सुद्धा बेकायदेशीर आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात अध्यक्ष आर. डी. पाटील सचिव मिलिंद पवार यांनी म्हटले आहे.




