

गंगाखेड-अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी
गंगाखेड- साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी नवीन व्यवहार नवीन खरेदीला अत्यंत महत्त्व आहे त्यासोबतच आपल्या पूर्वजांना पूजा पाठ करून जेवण देणे हे पण महत्त्वाचे आहे. भोलारामजी कांकरिया ट्रस्टच्या सचिव मंजुषा दर्डा यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गजवंत व्यक्तींना अन्नदान करून अक्षर तृतीया साजरी केली.
बीकेबीसी ट्रस्टच्या सचिव मंजुषा दर्डा यांनी माणुसकीची भिंत या सभा मंडपा मध्ये सकाळी साडेदहा वाजेपासून ज्या ज्येष्ठ व्यक्तींना घराचं कुठलाही आधार नाही जे खऱ्या अर्थाने भुके आहेत त्यांच्या घरी सणवार साजरा केला जात नाही अशा अनेकांना आज स्नेहभोजन अन्नदान करण्याचा कार्यक्रम केला. माणुसकीची भिंत सभागृह गोदावरी काठेवर आहे .सभोवताली सर्व मंदिरे आहे. सकाळपासून समाजातील विविध घटकातील लोकांची अक्षय तृतीयाची लगबग आनंदाने उत्साहाने चालू होती.समाजात अशाही काही व्यक्ती आहेत की ज्यांना कुठलाही आधार नाही किंवा एक वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या व्यक्तींना या अक्षय तृतीया कुठलंही महत्व दिसून येत नाही म्हणून खऱ्या अर्थाने अशा गरजूवंतांना मिष्ठान चे जेवण सकाळी साडेदहापासून ते सुमारे चार वाजेपर्यंत देण्यात आले यावेळी मंजुषा दर्डा आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या की खऱ्या अर्थाने आपण आपल्या घरी अक्षय तृतीया हा उत्सव आनंदाने साजरा करत असताना मात्र जे दिवसभरातले एक वेळेस जेवण पण परिपूर्ण करू शकत नाही अशा व्यक्तींना या शुभप्रसंगी जेवण देऊन मला मनस्वी आनंद झाला आहे असे याप्रसंगी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ दरडा, प्रीतम अच्छा,रमेशचंद धोका, सौ मंगल अच्छा,घनश्याम मालपाणी,यश गेलडा, शुभम अच्छा, ज्ञानेश्वर पेकम, पारस अच्छा, अमर गंगाखेडकर, सुजाता पेकम, पूजा दरडा इत्यादीनी सहभाग घेतला.











