✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.29मार्च):-आरक्षण हक्क कृती समितीच्या राज्य निमंत्रक असलेल्या महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय संघटनांची दि . 28 मार्च रोजी ऑनलाईन बैठक संपन्न झाली. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती दिनी दि 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांना वंदन करून खाजगीकरणाचा व ज्यात आरक्षण नसलेला दिनांक 14/ 3/ 2023 चा काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, मा.सर्वोच्य न्यायालयाने दिनांक 28/ 1/2022 रोजी आदेश दिले असून त्या अनुषंगाने केंद्र सरकारने (डीओपीटी) दिनांक 12/ 4/2022 रोजी निर्देश देऊन सुद्धा सरकारने पदोन्नतीतील आरक्षण न देणे, जुनी पेन्शन योजना सर्व निम सरकारी महामंडळे /प्राधिकरण यांसह सर्वाना सुरू करणे, सरकारने नेमलेल्या समितीने तीन महिन्यातच अहवाल द्यावा इत्यादी विविध प्रश्नासाठी सर्व मागासवर्गीय – बहुजन संघटनांचा मंत्रालयावर ( मुंबई, नवीमुंबई, ठाणे,पालघर जिल्ह्यांचा ) आणि इतर सर्व जिल्ह्यांचा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य निमंत्रक अनुक्रमे सुनिल निरभवने ( राज्य परिवहन ), एस के भंडारे (म्हाडा गृहनिर्माण ), सिद्धार्थ कांबळे (सेंट्रल रेल्वे युनियन ), शरद कांबळे (बँक असोशिएशन ), विजय चौरपगार ( शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना ), शामराव जवंजाळ (मागासवर्गीय शिक्षक संघटना ), सुरेश पवार ( आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटना ) आणि गौतम कांबळे (शिक्षक संघटना ) इत्यादी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.आपल्या SC, ST, DT,NT, SBC, OBC च्या न्याय हक्कासाठीच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आरक्षण हक्क कृती समितीने केले आहे.




