[प्रहार,जनशक्ती पक्ष शाखा बाळदी यांचे तहसीलदार यांना दिले निवेदन]
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995469
उमरखेड(दि.13मार्च):-बाळदी तालुका उमरखेड जि. यवतमाळ येथील तलाठी कार्यालयाचे काम गेल्या वर्षापासून पूर्ण होऊन सुध्दा सदर तलाठी कार्यालय (सज्जा) चे लोकार्पण अद्यापही झाले नाही.
तलाठी साहेब हे गावात राहत नसल्याने गावातील शेतकरी बांधवांना व नागरिकांना शासकीय कामानिमीत्त तलाठयाला भेटण्यासाठी उमरखेड येथे जावे लागते.
त्यामुळे शेतकरी बांधवांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो, तसेच तयार झालेली वास्तु लोकार्पणा अभावी धूळ खात असून सदर वास्तुवरील करण्यात आलेली रंगरंगोटी लावण्यात आलेले विद्युत उपकरणे तसेच इतर फर्नीचर खराब होत असुन शासनाच्या कोटयावधी रुपयांची नासधुस होत आहे.
कार्यालयाच्या परिसरात कमरे ऐवढाले गवत होऊन त्यात साप, विंचु या सारखे जीव घेणे प्राणी बाढत असल्याने परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.त्यामुळे महोदय वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळदी येथील तलाठी कार्यालयाचे (सज्जा) तात्काळ लोकार्पण करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवून द्यावी हि विनंती.
अन्यथा आमच्या पक्षातर्फे 15 दिवसांनी लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाच्या काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधीत प्रशासन जबाबदार राहील.
यावेळी निवेदन देतांना प्रवीण इंगळे (शाखा प्रमुख,बाळदी) विवेक जळके (प्रसिद्धी प्रमुख), प्रफुल्ल वानखडे, अविनाश दुधे, शंकर हरण, सागर धुळे, राजकुमार भगत, सत्यपाल पोपुलवाड, अमोल मिरासे, विशाल भोसले, दिलीप मिराशे,बंडू ठाकरे, महेश भोस्कर, आदेश बेळतकर, चैतन्य मिरासे, नामदेव वानखेडे इत्यादी उपास्थित होते.
