🔹भारतीय स्वराज्य पॅंथर सेना
✒️जिवती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जिवती(दि.23एप्रिल):- सद्या राज्यात व देशात भोंगा आणि हनुमान चालीसा चा प्रकरण चिघळण्याच्या स्थितीत असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते म्हणून भारतीय स्वराज्य पॅंथर सेनेच्या वतीने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच राज्याचे पोलिस महासंचालक यांना पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन जिवतीच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिनांक २ एप्रिल रोजी मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडव्याच्या दिवशी दोन समाजात तेढ निर्माण होवून दंगली घडवून मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने जाणिवपूर्वक हेतूपुरस्सर एका विशिष्ट धर्माविरुद्ध बेताल वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्था बिघडवून शांतता भंग केली आहे.राज ठाकरे यांनी असे वक्तव्य केले की मदरशांवर धाडी टाका त्यामध्ये काही सापडेल.
तसेच मशिदींवरील लागलेले भोंगे उतरावेच लागतील.नाहीतर मशिदी समोर जाऊन दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा पठण करणार असे वक्तव्य केले दि.१२ एप्रिल ला उत्तर सभा घेऊन त्या सभेत जाणिवपूर्वक व हेतूपुरस्सर पणे राष्ट्रीय एकात्मतेला बाधक व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेछूट बेताल विशिष्ट धर्मियांच्या भावना दुखावण्याचा उद्देशाने व दोन समाजात तेढ निर्माण करुन दंगली घडवून दहशत माजवण्याच्या हेतूने हेतूपुरस्सर आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि भविष्यात असेच वक्तव्य करू शकतात म्हणून राज ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावर राज्यभर भाषण बंदी आणि सभा बंदी आणावी यांच्या सभेसाठी मोर्चासाठी भाषणासाठी राज्य सरकारने परवानगी देवू नये अशा मागणीचे निवेदन भारतीय स्वराज्य पॅंथर सेनेचे अध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार तसेच उध्दव गोतावळे तालुकाध्यक्ष जिवती यांनी दिले