✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)
तलवाडा(दि.4एप्रिल):-ऊन ऊन ऊन्हारे, येऊ नकोस पुन्हारे ! म्हणत वयोवृद्ध, व बाल गोपाळांचा जिव ऊन्हाच्या तिर्वतेने व्याकुळ होत आसतांना राजेंद्र आश्रुबा गर्जे रा. चव्हाणवाडी तहत विठ्ठल नगर या शेतकऱ्याचा फिरता रसवंतीगृह ठरतोय लाभदायक ! मार्च, एप्रील, व मे महिना ऊन्हाच्या ऊकाड्याने नाहुन निघनारे दिवस वयोवृद्ध, व बाल गोपाळांसाठी अत्येंत पीडा दायक आसतांना महावितरणन त्यात केलेला लोडशीडींगचा कहर ऊन्हाची लहर वाढवत असुन कृत्रिम थंड पेयाची भर दवाखाने हाउसफुल करत आसतांना फिरता रसवंतीगृह लाभदायक ठरत असुन काही प्रमाणात का होईना ऊन्हाच्या कहरने कासावीस होत आसलेल्या मनाला दिलासा मिळत असल्याने नागरिकातुन समाधान व्येक्त केल्या जात आहे.