✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.25मार्च):-राज्यात धान उत्पादक शेतकर्यांच्या धानाला बोनस देण्याची पद्धत २०१३ सालापासून सुरू होती, परंतू यावर्षी मविआ सरकारने शेतकर्यांना बोनसची रक्कम देण्यासाठी अद्यापही शासनस्तरावर कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया अशा धान उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकर्यांना त्वरित बोनस देण्याच्या मागणीसाठी आज जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाभर निदर्शने आंदोलन पार पडली.चंद्रपूरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात मी सहभागी होऊन निदर्शने दिली आणि धानाला बोनसची मागणी केली.आंदोलनानंतर, शिष्टमंडळासह उप जिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी मांजे यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.
राज्यामध्ये २०१३ पासून शेतकर्यांच्या धानाला बोनस दिल्या जाते. मागील पाच वर्षांतही भाजपा सरकारने हे बोनस दिले. परंतू जनमताचा अवमान करून सत्तेत आलेल्या या विश्वासघाती मविआ सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. शेतकर्याच्या बांधावर जाऊन हेक्टरी ५० हजार मदत देण्यात यावी, अशी मागणी करणारे उद्धव ठाकरे आज स्वतः मुख्यंत्री आहेत, परंतू त्यांना आता राज्यातील शेतकऱ्यांचा विसर पडलेला दिसतो. असेच या सरकारच्या निर्णयांवरून वाटते.लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विधानसभेत धान उत्पादक शेतकर्यांच्या बोनस संदर्भात प्रश्न मांडला परंतु या शेतकरीविरोधी सरकारने शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या दृष्टीने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. एकुणच मविआ सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण आहे. असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी, महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा उपाध्यक्ष रामपाल सिंह, तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, महामंत्री विजय आगरे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अनिल डोंगरे, माजी जि. प. सदस्य गौतमजी निमगडे, माजी पं. स. सभापती केमाताई रायपुरे, माजी उपसभापती विकास जुमनाके, सुभाष पिंपळशेंडे, बालू भोंगळे, राकेश गौरकर, ऋषी कोवे, पारस पिंपळकर, अनिताताई भोयर, अजय चार्लेकर, फारूश शेख, गणपत चौधरी, विनोद खडसे, मंगेश राजगडकर, सुशांत शर्मा, आशिष वाढई, भारत रोहणे, संदिप ठाकरे, बंटी भोस्कर, दीपक खनके, आदिंसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.