



🔹प्रहारचे विशाल सपकाळ यांचा हल्लाबोल..
🔸मोहोळ तालुका प्रतिनिधी: नानासाहेब ननवरे
✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308
कुरुल(दि.4मार्च):- सध्या वीजबिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणने शेतकरी बांधवांना वेठीस धरलेले आहे. आणि थकित वीजबिला पोटी पठाणी वसुलीच्या मार्गाने शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली जात आहे त.आणि ही कनेक्शन तोडून आणखीन जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना अडचणीत ढकले जात आहे.एकतर या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठी झाल्या मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे.यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रमुख पीक मानले जाणारे ऊस पीक अजून कारखान्याला गेलेले नाही.आणि गेल्यावर्षी गेलेल्या उसाची अजूनही काही कारखान्यांनी उसबिले दिलेली नाहीत.
मग शेतकरी वीजबिल कोठून भरणार! असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेचे उत्तर सोलापूर तालुकाप्रमुख विशाल सपकाळ यांनी केला आहे. तरी शेतकऱ्यांची वीज सुरळीत करून विजतोडणी तात्काळ थांबवावी अशी मागणी प्रहार च्या वतीने करण्यात येत आहे.ही मागणी वीजवितरणने मान्य न केल्यास प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर येथील मेन महावितरण कार्यालयासमोर समोर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील व शहरप्रमुख अजित भाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र ठिय्या आंदो लन केले जाईल .
चौकट : *विशाल सपकाळ* *(शेतकरी पुत्र)* सध्या महावितरणने शेतकऱ्यांना वीजबिलासाठी वेठीस धरू नये.सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.शेतकऱ्यांचे मुख्य पीक असणारे ऊस पीक अजून काही शेतकऱ्यांचे कारखान्याला गेलेला नाही.आणि गेलेल्या उसाची बिले अजूनही कारखानदारांनी दिलेली नाहीत.यामुळे शेतकऱ्यांना महावितरणने वेठीस धरू नये.





