Home गडचिरोली 1 जानेवारी ला भीमकोरेगाव येथील भारत मुक्ती मोर्चाच्या सभेत मा. वामन मेश्राम...

1 जानेवारी ला भीमकोरेगाव येथील भारत मुक्ती मोर्चाच्या सभेत मा. वामन मेश्राम यांच्या हस्ते ऐतिहासिक ग्रंथाचे प्रकाशन

77

🔹शिव-फुले-शाहू-आंबेडकरविरोधी नरहर कुरुंदकरच्या भूमिकेची चिकित्सा

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.30डिसेंबर):-डॉ. विलास खरात (डायरेक्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, नवी दिल्ली लिखित असलेल्या महत्त्वाचे, ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशन १ जानेवारी २०२१ रोजी भारत मुक्ती मोर्चाच्या भव्य जाहीर सभेत मा. वामन मेश्राम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.नरहर कुरुंदकर यांचा दावा होता की, त्यांना तर्काने, पुराव्याने हरविणारा कोणी असेल तर हेच त्यांचे मरण असेल! कुरूंदकरांच्या सर्वच भूमिकांचे खंडन लेखक डॉ. विलास खरात यांनी केले आहे. नरहर कुरूंदकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची केवळ बदनामीच केली नाही तर त्यांचे चरित्रहनन देखील केले.

छत्रपतींच्या घराण्याबद्दल भयंकर तिरस्कार कुरुंदकरांचा असण्यामागे ब्राम्हणी वर्चस्व हाच आहे. एवढेच नाही तर कुरूंदकरांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा वास्तविक इतिहास कळू नये म्हणून योजनापूर्वक विकृत, आक्रस्ताळपणे लेखन केले. मुळात कुरूंदकर मराठाद्वेषी व सत्यशोधक चळवळी विरुद्ध होते. कुरुंदकरांनी फुले-शाहू, आंबेडकर यांची बदनामी करणारे लेखन केले आहे. त्यांच्या भूमिकेचे खंडन करणे नितांत गरजेचे होते. मराठवाड्यात कुरूंदकरांच्या नावाने एक पंथच आहे. त्या पंथाने कुरुंदकरांच्या विकृत व बहुजनद्वेषी लेखनाचा हेतुपूर्वक प्रचार करून सामाजिक वातावरण नेहमी कलुषित करीत असतात. त्या कुरुंदकर पंथास आता चपराक बसणार आहे. कुरुंदकर पंथाचा शेवट होईल!

समाजवादी ब्राम्हण नरहर कुरुंदकर यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या बद्दल जे विषारी लेखन केले आहे त्याचे सप्रमाण खंडन-मंडन या ग्रंथात आहे. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीला काउंटर करण्यासाठी व महाराष्ट्रात ब्राम्हणांची सत्ता, व्यवस्था स्थापित करण्यासाठी नरहर कुरुंदकर यांनी काय काय खेळी खेळल्या, काय काय षड्यंत्र केले हे नव्या पिढीला जाणून व समजून घेणे गरजेचे आहे. डॉ. विलास खरात यांनी सदरील ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडी साठी सादर केला आहे व त्यांना या संशोधनाबद्दल विद्यापीठाने पीएचडी डिग्री ही दिली आहे. या ग्रंथामुळे वैचारिक वादळ निर्माण होईल व चळवळीला दिशा तसेच गती मिळेल! सदरील ग्रंथावर येत्या काळात मराठवाड्यात जाहीर परिसंवाद,चर्चासत्र ही आयोजित केले जातील.

Previous articleफडणवीसांच्या काळात पन्नास टक्के निधी वेळोवेळी मिळाल्याने बीड रेल्वेला गती..
Next articleअडपली (माल) येथे मुक्तीपथ मूलचेरा तर्फ़े व्यसनमुक्तीवर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ भास्कर फरकडे चामोर्शी तालूका प्रतीनिधी 9404071883 चामोर्शी :- (प्रतीनिधी दि.30 डिसेंबर ) सर्च फाउंडेशन गडचिरोली तर्फे मुक्तीपथ संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात व्यसनमुक्ती वर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली माल येथे दिनांक 29.12.2021 रोज बुधवारला रुपेश अंबादे मूलचेरा तालुका मुक्तीपथ समन्वयक यांनी व्यसनमुक्तीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आजच्या युवक व युवतींनी स्वतःला व आई वडिलांना व्यसनापासून कसे मुक्त ठेवावे हे यावेळी सांगितले तसेच त्यांनी व्यसनामुळे आपला पैसाही खर्च होतो व आपले आरोग्यही बिघडते म्हणून व्यसनापासून दूर राहावे व चांगले शिक्षण घेऊन चांगले जबाबदार नागरिक बनावे असा विद्यार्थ्यांना मौलिक संदेश देण्यात आला कार्यक्रमाचे संचालन मेघश्याम भोयर यांनी केले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नारायण बोरकुटे, रथीन्द्र सरकार, मंटू सरकार, सुरेश ब्राह्मणकर,जाईद शेख, यादव मडावी,राजेंद्र लाकडे, दिपक नाइकवार, कल्पना गुंडावार आदी शिक्षक व दिवाकर गेडाम लिपिक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे शेवटी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्याची शपथ देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here